Magel Tyala Shettale : राज्यातील अनेक नागरिक हे शेती व अवलंबून असतात. परंतु राज्यामध्ये अनेक भागात पाण्याची तुटवडा ही गंभीर समस्या आहे. विशेषता: मराठवाडा आणि विदर्भ या परदेशामध्ये दुष्काळाची संकट वारंवार निर्माण होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे मागेल त्याला शेततळे योजना.
राज्यातील शेतकरी हे आजही पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे या शेतकऱ्यांचे मुख्य अवलंबन म्हणजे पावसाचे पाणी आहे परंतु अनियमित पावसामुळे आणि परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो शेतातील पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य शासनाने 2016 मध्ये मागील त्याला शेततळे योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विशेषता: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,अपंग व्यक्ती, मागासवर्गीय आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेत प्राथमिकता दिली जाते.Magel Tyala Shettale

या योजनेचा मुख्य उद्देश काय?
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे उपलब्ध करून देणे. जेणेकरून शेतकऱ्यांना या शेततळ्याद्वारे पावसाचे पाणी साठवून ठेवणे शक्य होईल. आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांना या पाण्याची अत्य आवश्यकता असेल त्यावेळेस ठेवून योग्य तो वापर करू शकेल. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षभरात कोणतीही पिके घेणे घेणे शक्य होईल. शेतकऱ्यांचे पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान या योजनेमुळे टळू शकते .Magel Tyala Shettale
हे वाचा : या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं ; आदित्य तटकरे यांनी दिली मोठी माहिती…!
शेततळे बांधल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार?
- शेतकऱ्यांना शेततळे बांधल्यामुळे पावसाचे पाणी सासून पाण्याची कमतरता असेल त्यावेळेस वापर करणे शक्य होईल .
- शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभरासाठी पाणी उपलब्ध राहील .
- पाण्यामुळे पिकाची उत्पादन वाढेल .
- पिकाचू उत्पन्न वाढल्यामुळे दुष्काळाचा प्रभाव कमी होतो
- तसेच शेतकऱ्यांची उत्पन्नही वाढेल .
मागेल त्याला शेततळे या योजनेचा तपशील
या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते .राज्य सरकारने शेततळे बांधण्यासाठी 50,00 हजार रुपये पेक्षा जास्त अनुदान देण्यात देण्यात येते .काही नागरिकांना तर हे अनुदान 75 हजार रुपये दिले जाऊ शकते.51 हजार 369 शेततळे तयार करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. Magel Tyala Shettale
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे .
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 0.60 हेक्टर स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे .
- शेतकऱ्यांकडे शेततळ बांधण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे .
- शेतकऱ्यांकडे शेतातील पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य व्यवस्था .असावी .
या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
- शेतकऱ्यांच्या आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- सातबारा उतारा
- आठ अ नकाशा
- जमीन मालकीची कागदपत्रे
- बँक पासबुक(आधार शेडिंग केलेले)
- बीपीएल कार्ड(असेल तर)
अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे .
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल .
- यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि वापरकर्ता आयडीने लॉगिन करून घ्यावा लागेल .
- यानंतर आता तुमच्यासमोर सिंचन साधने हा पर्याय उपलब्ध असेल तुम्हाला हा सिंचन साधने व सुविधा पर्याय निवडून घ्यावा लागेल .
- त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडावा लागेल .
- यानंतर उपघटकांमध्ये योग्य तो पर्याय निवडा (इनलेट-आउटलेट, शिवाय सुचवले जाते)
- त्यानंतर तुम्हाला शेततळ्याचा आकार मान निवडून घ्या .
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या परिवर क्लिक करून अर्ज सबमिट करा .
- अशा पद्धतीने तुम्ही शेततळे (Magel Tyala Shettale) योजनेसाठी अर्ज करू शकतात .