soybean hami bhav kharedi महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ!

soybean hami bhav kharedi केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेलंगणातील सोयाबीन खरेदीला १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा soybean hami bhav kharedi

कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, “२०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणामध्ये सोयाबीन खरेदीस मान्यता देण्यात आली. ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत १९.९९ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आले असून यामुळे ८,४६,२५१ शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांना अधिक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्रात २४ दिवस आणि तेलंगणामध्ये १५ दिवस खरेदी कालावधी वाढवण्यात आला आहे.” असे चौहान यांनी सांगितले.

soybean hami bhav kharedi

शेतकऱ्यांची मागणी आणि आंदोलन

soybean hami bhav kharedi महाराष्ट्रात ६ फेब्रुवारी ही सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत होती. मात्र, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही घरात पडून होते. तसेच अंतिम मुदतीच्या दरम्यान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा होत्या. मात्र, मुदत संपल्यानंतर खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी मुदतवाढीची मागणी केली होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

हे वाचा: या जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पिक विमा.

सरकारी खरेदी बंद झाल्यानंतर राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. सोयाबीनचे भाव ३,४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले होते. तसेच प्रक्रिया उद्योगांनीही दर घटवले, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील किसान सभेने आंदोलनाचा इशारा दिला आणि कृषिमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून निषेध करण्याचा इशारा दिला. परिणामी, केंद्र सरकारने अखेर महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ दिली.

हमीभाव खरेदीचे फायदे

हमीभाव खरेदीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळते. यावर्षी सरकारने निश्चित केलेला हमीभाव ४,६०० रुपये प्रति क्विंटल असल्याने सरकारी खरेदीत विक्री केल्यास शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तुलनेत अधिक दर मिळू शकतो. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होतो आणि आर्थिक नुकसान टाळता येते. तसेच सरकारी खरेदीमुळे बाजारातील दर सुधारण्यास मदत होते आणि व्यापाऱ्यांवरही योग्य दर देण्याचा दबाव येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता वाढते.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

soybean hami bhav kharedi सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन हमीभावाच्या दरात आपले उत्पादन विकावे. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि नुकसान होण्याची शक्यता कमी राहील. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि सोयाबीन बाजारात स्थैर्य निर्माण होण्यास मदत होईल.

Leave a comment