dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana : 13 मे 2025 रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा जवळपास 94% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. निकाल लागल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की, ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत त्यांना 2 लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. हा मेसेज विशेषतः अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी असल्याचे नमूद करण्यात आले होते.

हा मेसेज WhatsApp ग्रुप, फेसबुक पोस्ट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरला. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर शोध घेण्यास सुरुवात केली. यामुळे एक प्रकारची संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बार्टी (BARTI) कडून अधिकृत स्पष्टीकरण
dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana या व्हायरल मेसेजबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे कडून 14 मे 2025 रोजी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात BARTI ने खालील मुद्दे स्पष्टपणे मांडले:
- “भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना” 2021 साली जाहीर करण्यात आली होती.
- परंतु त्या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती, म्हणजे ती प्रत्यक्षात लागूच झाली नव्हती.
- सद्यस्थितीत अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही.
- सोशल मीडियावर फिरणारे मेसेज चुकीचे आणि भ्रामक आहेत.
या निवेदनात पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी.
पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करावे?
अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी “हा अर्ज कसा करायचा?”, “कुठे अर्ज पाठवायचा?”, “कोणते कागदपत्र लागतात?” असे प्रश्न विचारले. काहीजणांनी BARTI च्या ईमेलवर मेल केले, काहींनी हेल्पलाईन नंबरवर फोन केले. पण अखेरीस अधिकृत स्पष्टीकरण आल्यावर हे लक्षात आले की सध्या तरी कोणतीही शिष्यवृत्तीची योजना सुरु नाही.
तरीही अशी अफवा पसरवणाऱ्यांचा हेतू वाईट नव्हता. त्यांनी मेसेज फॉरवर्ड करताना कदाचित काही विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, या विचाराने तो पुढे पाठवला असावा. मात्र शहानिशा न करता माहिती पसरवणे चुकीचे आहे.
निष्कर्ष dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana
अफवांपासून सावध राहा दहावी मध्ये “90% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये शिष्यवृत्ती” असा मेसेज पूर्णतः चुकीचा आणि भ्रामक आहे. BARTI संस्थेने स्पष्ट केले आहे की, सध्या अशी कोणतीही योजना सुरु नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही माहितीवर लगेच विश्वास ठेवू नये. अधिकृत वेबसाइट आणि सरकारी पोर्टलवर मिळालेली माहितीच खरी मानावी.
dr babasaheb ambedkar vishesh anudan yojana