माझी लाडकी बहीण योजना: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. ladaki bahin yojana update

ladaki bahin yojana update राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेने, योजनेच्या निधीत वाढ होणार की नाही, याविषयीची उत्सुकता आता संपली आहे.

विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही महिलांच्या मदतीसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली, पण काही विरोधकांनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘सावत्र भावांप्रमाणे’ या योजनेच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. तसेच, योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा चुकीचा आरोपही केला.

यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या योजनेचे पैसे थेट सरकारच्या खात्यातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतात, त्यामुळे भ्रष्टाचाराला वावच नाही. ते म्हणाले, “भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे.” त्यांनी खात्री दिली की, या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रामाणिक महिलांना हा लाभ मिळतच राहील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

योजना कायम राहणार का? ladaki bahin yojana update

निवडणुकीपूर्वी काही विरोधकांनी ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच आहे आणि निवडणूक झाल्यावर ती बंद होईल, अशा अफवा पसरवल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

ते म्हणाले, “आम्ही निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली आहे आणि पुढील पाचही वर्षे ती अशीच सुरू राहणार आहे.” त्यांनी राज्यातील महिलांना खात्री दिली की, “आम्ही फक्त निवडणुकीपुरते नाही, तर तुमच्या कायमस्वरूपी सोबत आहोत.”

योजनेच्या निधीत वाढ होणार!

अनेक दिवसांपासून ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम वाढणार का, अशी चर्चा सुरू होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वात महत्त्वाची घोषणा केली.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातही अनेक योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ योजना त्यापैकीच एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी अनेक भगिनींनी केली आहे आणि आम्ही योग्य वेळी या निधीत वाढ करणार आहोत.”

या घोषणेमुळे लवकरच योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे, जी राज्यातील महिलांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे.

योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

काही लोकांनी योजनेचा गैरवापर केल्याबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केले. “काही इतके हुशार भाऊ निघाले की त्यांनी बहिणींच्या नावावर अर्ज भरले आणि पैसे घेतले,” असे ते म्हणाले.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

या प्रकरणांची तपासणी सुरू असून, योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळेल याची सरकार काळजी घेत आहे.

Leave a comment