Agriculture Decision:केंद्र सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना होणार लाखोंचा फायदा, पहा सविस्तर माहिती.

Agriculture Decision : 25 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, युवक आणि नवोद्योगांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. चला तर आज आपण या लेखामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण – कोणते निर्णय घेतले ते पाहू .

Agriculture Decision नैसर्गिक शेतीला चालना

केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानासाठी 2,481 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • याचा फायदा 1 कोटी शेतकऱ्यांना अभियानाचा लाभ घेता येणार आहे.
  • नैसर्गिक शेतीमुळे मातीची गुणवत्ता सुधारेल, रासायनिक खतांचा वापर कमी होईल, आणि निरोगी अन्न उत्पादन होईल.
    या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना अधिक नफा मिळण्याची अपेक्षा आहे.

युवकांसाठी ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ योजना

तरुणाईला सक्षम बनवण्यासाठी सरकारने ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
  • या योजनेसाठी 6,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .
  • या योजनेतून युवकांना विविध सेवा एकाच ठिकाणी मिळतील, ज्यामुळे त्यांचे शिक्षण, व्यवसाय आणि कौशल्य विकास सोपे होईल.

नवोद्योगांसाठी अटल इनोव्हेशन मिशन 2.0

नवोद्योगांना चालना देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन 2.0 मंजूर करण्यात आले आहे.

  • या उपक्रमासाठी 2,750 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत .
  • या उपक्रमाअंतर्गत देशभरात 30 नवीन इनोव्हेशन सेंटर्स सुरू होतील, ज्यामुळे स्टार्टअप आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील.

हे वाचा: शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या योजना

पॅन कार्ड प्रक्रिया सोपी

पॅन कार्ड जारी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी पॅन 2.0 योजना सुरू करण्यात आली आहे.

  • या योजनेमुळे अर्ज करणे आणि पडताळणी ऑनलाइन सोप्या पद्धतीने होईल.
  • नागरिकांना वेळ वाचेल आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढेल.

रेल्वे प्रकल्पांसाठी मोठी गुंतवणूक

देशातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाने तीन महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

  • या प्रकल्पासाठी 7,927 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
  • या प्रकल्पांमुळे वाहतूक अधिक गतिमान होईल आणि मालवाहतुकीचा खर्च कमी होईल.

एकूण परिणाम

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे शेतकरी, युवक आणि उद्योजकांसाठी नवी दिशा निर्माण होईल. देशातील सर्वांगीण विकासासाठी हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.Agriculture Decision

Leave a comment