farmer loan waiver : योग्य वेळी शेतकऱ्याची सरकार कर्जमाफी करेल: चंद्रशेखर बावनकुळे

farmer loan waiver: मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरन्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन आणि लाडक्या बहिणी ना दिलेले आश्वासन माहिती सरकार विसरले असल्याची विरोधकाकडून चर्चा केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आणि लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 आश्वासन महायुती सरकारकडून जाहीरनामात करण्यात आले होते. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात कर्जमाफी याबद्दल माहिती दिली आहे.

राज्यात जीवंत सातबारा मोहीम

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

farmer loan waiver चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की रचला आर्थिक शिस्त लावली अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाने दिलेले आश्वासने आत्ता लगेच पूर्ण करणे शक्य नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. राज्य सरकार हळूहळू दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल असे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले. महायुतीतील अनेक नेते लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती नेहमी देत आहेत. त्यातच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल देखील मोठे विधान केले आहे.

farmer loan waiver

योग्य वेळी कर्जमाफी करु

आम्ही विधानसभा निवडणुकीदरम्यान केला संकल्प पुढील पाच वर्षात पूर्ण करू अशी घोषणा केली होती. त्यानुसारच पुढील पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे देखील सांगितले होते. आम्ही जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या सर्व गोष्टी पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. आमचे सरकार योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करणार आहे. ज्यावेळी आम्ही पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ त्यावेळी आम्ही दिलेल्या आश्वासनामधील एकही मुद्दा शिल्लक ठेवणार नाही. जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता आम्ही पुढील निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार आहोत. अशी आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

शेतकरी कर्जमाफी कधी farmer loan waiver

निवडणुकीदरम्यान पक्षांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले होते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाफी मिळणार अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना लागली होती. परंतु महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला. यावर विरोधकाकडून या आश्वासनाचे आठवण करून दिल्यानंतर त्यामध्ये महायुती सरकारमधील विविध नेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी मिळू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील शेतकरी कर्जमाफी बद्दल स्पष्ट बोलले होते. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल वादग्रस्त विधान केले. आणि आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल अधिक स्पष्टता दिली आहे. यानुसार राज्य शासन सध्यातरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देऊ शकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

farmer loan waiver महायुती सरकार मधील सर्वांच्या बोलण्यावरून शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. परंतु पुढील पाच वर्षांमध्ये नक्कीच सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे देखील सर्व कडून बोलले जात आहे. अजून किती दिवस शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार हे देखील पहावच लागणार आहे.

1 thought on “farmer loan waiver : योग्य वेळी शेतकऱ्याची सरकार कर्जमाफी करेल: चंद्रशेखर बावनकुळे”

Leave a comment