Maharashtra Weather Update: राज्यात सध्या उष्णतेची लाट वाढताना दिसत आहे. आणि त्यात आता येत्या 48 तासात अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना आणि नागरिकांना करावा लागणार आहे.
राज्यामध्ये एकीकडे तीव्र उन्हाची चटके तर दुसरीकडे वादळी पाऊस वारा गारपीट अशा एकंदर परिस्थितीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार होत असताना दिसत आहे. Maharashtra Weather Update


आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार
imd ने दिलेल्या माहितीनुसार , देशात मध्य प्रदेश पासून ते विदर्भ मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
याशिवाय मध्यप्रदेशासह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण 900 मीटर उंचीवर चक्रकार वारी वाहताना दिसत आहेत, यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यात काही अवकाळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता देण्यात आली आहे .मराठवाडा आणि विदर्भातील या हवामानाचा परिणाम राज्याच्या इतर भागांवरही होताना दिसत आहे . हवामान विभागाने दिलेली अंदाजानुसार मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या ढगाळ वातावरण राहील असा अंदाज देण्यात आला आहे . दरम्यान सध्या राज्याच्या पर्वतरांगांमध्ये ही उष्णतेची लाट जाणवत आहे .Maharashtra Weather Update
हे वाचा : फोन पे,गुगल पे,पेटीएम का झाले बंद? npci ने सांगितले कारण…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
फळबागांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे . बागायतदार शेतकऱ्यांनी वादळी वारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावी, वाऱ्यामुळे फळाच्या झाडाच्या मोडलेल्या खांद्याची छाटणी करावी . त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फळबागांची नवीन लागवड केली आहे व फळांची झाडे लहान आहेत अशा शेतकऱ्यांनी त्या झाडांना काठीने आधार द्यावा,असा सल्ला देण्यात आला आहे. Maharashtra Weather Update




