आज पासून ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात ; पिक विमा साठी 1927 कोटी रुपये मंजूर : Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 : 10 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून अहमदनगर जिल्ह्यामधील विमा धारक शेतकऱ्यांना 2023 सालची थकीत पीक विमा नुकसान भरपाई खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे तर उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच विमान नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती देखील दिली आहे.

हे वाचा : ड्रॅगन फ्रुट पिकात शोधली संधी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 खरीप हंगाम 2023 राज्यात एकूण साधारणपणे 721 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पिक विमा योजना राज्यामध्ये बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजे ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाली आहे त्या ठिकाणी 110 टक्‍क्‍यांपर्यंत विमा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्त्वानुसार खरीप हंगाम 2023 मधील मंजूर 721 कोटी रुपयांपैकी विमा कंपनीमार्फत रुपये 546 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

Pik Vima Yojana 2024 उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी रुपये 1927 कोटीची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती सर्वात जास्त पीक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून घेणे होते या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या दरम्यान त्याच 30 सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगर शहर सहा जिल्ह्यांचा प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाई असल्यामुळे सुमारे 1927 कोटी रुपयांची रक्कम देण्याचा जीआर प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच ही नुकसान भरपाई जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

Pik Vima Yojana 2024 आज पासून पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात :

प्रलंबित नुकसान भरपाई मध्ये नाशिक रुपये 656 कोटी, जळगाव 470 कोटी रुपये, अहमदनगर 713 कोटी रुपये, सोलापूर 2.66 कोटी, सातारा 27.73 कोटी रुपये आणि चंद्रपूर 58.90 कोटी रुपये प्रलंबित होते या प्रलंबित रक्कम रुपये 1927 कोटी मंजूर केले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती लगेच जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे 10 ऑक्टोंबर नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a comment