ration kyc deadline: रेशन कार्डधारकांना शेवटची संधी… अन्यथा लाभ होणार बंद!

ration kyc deadline : केंद्र सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी देशात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवली जाते. योजनेचे अंतर्गत देशातील पात्र असणाऱ्या नागरिकांना महिन्याला अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते. या अन्नधान्यांमध्ये बनावट नोंदी आणि मयत व्यक्तींना वगळण्यासाठी केंद्र सरकारने केवायसी मोहीम हाती घेतली. जे नागरिक आपली केवायसी करतील त्याच नागरिकांना यापुढे लाभ सुरू ठेवण्यात येईल असे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत

देशातील रेशन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींना ई केवायसी (ration kyc deadline) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इ केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाने याआधी 31 मार्च ही अंतिम तारीख दिली होती. त्यामध्ये वाढ करून केवायसी करण्यासाठी नागरिकांना 30 एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. 30 एप्रिल नंतर ज्या नागरिकांची केवायसी झालेली नसेल त्या नागरिकांना या योजनेमधून वगळण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. ration kyc deadline

ration kyc deadline

30 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे

केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण आपल्याजवळ रेशन कार्ड दुकानांमध्ये जाऊन देखील आपली इ केवायसी पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. जे नागरिक 30 एप्रिल 2025 पूर्वी आपली केवायसी पूर्ण करणार नाहीत या नागरिकांचे नाव रेशन कार्ड वरून हटवण्यात येणार आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने देखील सुरू करण्यात आलेली आहे. आपण घरबसल्या देखील आपली केवायसी पूर्ण करू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

केंद्र सरकारने याआधी सहा वेळा केवायसी करण्यासाठी नागरिकांना मुदत वाढ दिलेली आहे. केंद्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने देशातील सर्व राज्यांना पत्र लिहून केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे देखील या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे.ration kyc deadline

हे वाचा : कृषी विभागाच्या कांदा चाळ अनुदानात आणि ट्रॅक्टर अनुदानात झाली दुप्पट वाढ…!

आपल्या मोबाइल वरून देखिल करता येणार kyc

अनेक नागरिकांना केवायसी करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे सरकारकडून केवायसी करण्याची प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून देखील सुरू करण्यात आलेली आहे. अद्याप पर्यंत जर आपण केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून देखील आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता. केवायसी करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये रेशन कार्ड केवायसी हे ॲप असणे आवश्यक आहे. या ॲप सोबतच आपल्या मोबाईल मध्ये आधार फेस आरडी हे ॲप देखील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन्ही ॲपच्या माध्यमातून आपण आपली रेशन कार्ड केवायसी पूर्ण करू शकता. रेशन कार्ड केवायसी प्रक्रिया मोबाईलच्या माध्यमातून कशी पूर्ण करायची याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. ration kyc deadline

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

kyc का आहे महत्वाची

शासनाकडे सादर झालेल्या रिपोर्टच्या आकडेवारीनुसार अद्याप पर्यंत देशातील 23 टक्के रेशन कार्ड धारकांची केवायसी पूर्ण झालेली नाही. या केवायसी प्रक्रिया मध्ये बनावट व्यक्तींचे आणि मयत व्यक्तींची नावे वगळण्याचे काम केले जाणार आहे. जे रेशन कार्ड धारक आपली केवायसी करणार नाही त्यांना या बनावट यादीमध्ये किंवा मयत यादीमध्ये समाविष्ट करून त्यांचे नाव रेशन कार्ड मधून कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे. ज्यामुळे केवायसी न करणाऱ्या नागरिकांना यापुढे कोणत्याही प्रकारचा लाभ रेशन कार्ड अंतर्गत वितरित केला जाणार नाही. आपल्याला आपला रेशन कार्ड लाभ सुरळीत हवा असेल तर आपल्याला आपली रेशन कार्ड केवायसी प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.ration kyc deadline

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

Leave a comment