shasan nirnay : राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. सरकारने शासन निर्णय जाहीर करून. राज्यातील शेतकऱ्यांना गाळ माती आणि मुरूम यासाठी आता रॉयल्टी बंद करण्याचा निर्णय (shasan nirnay) घेतला आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील शेत रस्त्याला मोठा फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना देखील या शासन निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे.
शासनाने घेतलेल्या निर्णयाचा ग्रामीण भागातील नागरिकांना शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेत रस्ते अधिक मजबूत होतील. महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने याबाबत अधिकृत शासन निर्णयाच्या माध्यमातून घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेत रस्त्यासाठी सहजपणे मुरूम आणि माती उपलब्ध होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये गाळ टाकायचा आहे अशा शेतकऱ्यांना देखील आता कोणत्याही प्रकारची रॉयल्टी द्यायची आवश्यकता राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास होईल. shasan nirnay

पाणंद रस्ते होणार उत्तम
शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयाच्या माध्यमातून मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे राज्यात राबवली जाईल. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे ही मुरूम माती उपलब्ध नसल्यामुळे किंवा यावर रॉयल्टी लागत असल्यामुळे बंद करण्यात आली होती. आता रॉयल्टी हटवण्याबाबतचा महसूल विभागाचा निर्णय या कामांना अधिक गती देईल. रस्त्यांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणाची साधने देखील सुधारतील. शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील. shasan nirnay
हे वाचा : 50000 रुपये अतिरिक्त मिळणार, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी.
रॉयल्टी माफ निर्णयाचा फायदाच
शेतकऱ्यांना तसेच घरकुल लाभार्थ्यांना गाळ माती मुरूम दगड यासारख्या नैसर्गिक साधनांना वापरण्यासाठी आता कोणताही शासकीय शुल्क भरणे आवश्यक नाही. या साहित्याचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात जाणारे रस्ते अधिक मजबूत बनवतील. या शासनाचे निर्णयामुळे (shasan nirnay) ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर विकास कामासाठी लागणाऱ्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होणार आहे.
घरकुल लाभार्थ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना घराच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळवण्यासाठी अधिकचा खर्च उचलावा लागत होता. या शासनाच्या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना देखील रॉयल्टी फ्री मुरूम दगड माती उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक नसतात. अशी शेतकरी धरणातील गाळ उपसून आपल्या शेतात टाकून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवतात. अशा शेतकऱ्यांना देखील आता माती शेतात टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही. शेतकऱ्यांना फक्त स्वखर्चाने वाहतूक करावी लागणार आहे. फक्त वाहतुकीच्या खर्चावरच शेतकरी आपल्या जमिनीमध्ये आपल्याला हवी तेवढी माती आता टाकू शकतील. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये माती टाकल्याने शेतीची सुपीकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. shasan nirnay