shetkari karj mafi news: महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती शासनाला या शेतकरी कर्जमाफीचा विसरच पडला. याचीच आठवण करून देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांना शेतकरी कर्जमाफी यावर समिती स्थापन करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले. याबाबत शासनाने हळूहळू पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. याबाबतच बोलतानी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
राज्याचे महसूल मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल आणि कोणते शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहतील. कर्ज माफीचा कोणाला लाभ मिळेल त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना खरोखरच कर्जमाफीची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी माहिती दिली. शासनाच्या या कर्जमाफी योजनेचा फक्त गरजू शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाईल असेही ते म्हणाले.
याच शेतकऱ्यांना लाभ shetkari karj mafi news
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केली की सरकार गरजू आणि आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नक्की देणार आहे. परंतु शासन मोठमोठे फार्म हाऊस असलेले शेतकरी, मोठे लेआउट चे मालक, शेतीवर कर्ज काढून शहरांमध्ये फिरणारे लोक यांना शासन कर्ज माफीचा लाभ देणार नाही. यातून असे स्पष्ट होते की शासन कर्जमाफी करताना सरसकट कर्जमाफी करणार नाही. यातून अनेक पात्र शेतकरी देखील वगळले जाण्याची दाट शक्यता आहे.
शासन समिती स्थापन करणार
शासनाच्या कर्जमाफी धोरणाबाबत शासन एक समिती स्थापन करणार आहे. या समितीच्या माध्यमातून पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्यामधून पात्र असणारे शेतकरी आणि अपात्र असणारे शेतकरी यांच्या वेगवेगळ्या याद्या तयार केल्या जातील . या समितीच्या अभ्यासातून शासनाने कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही हे स्पष्ट केले जाईल.
कर्ज माफी कधी
शासनाने लागू केलेले नियम अटी आणि समिती या सर्वच गोष्ट एक प्रकारे शेतकऱ्यांना मान्यच आहे. परंतु ही समिती अहवाल कधी सादर करणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार ? याबाबत सरकारकडून कोणती स्पष्टता देण्यात आलेली नाही. शासनाने कर्जमाफी करण्याची निश्चित तारीख द्यावी आणि त्या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. परंतु सरकार याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नाही किंवा निश्चित तारीख शेतकऱ्यांना देत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी कधी होईल हे निश्चितपणे सांगणे कठीणच आहे.
या सर्व प्रकारानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्द्याला शासन अधिक प्रभावीपणे घेत नसल्याचे समोर आलेले आहे. अद्याप पर्यंत शेतकरी कर्जमाफी समिती स्थापन नाही, समितीच्या माध्यमातून कसे कार्य केले जाणार हेही स्पष्ट नाही, आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणत्या तारखेला मिळणार हे देखील स्पष्ट नाही. त्यामुळे अजून देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. याबाबत लवकरच शासन स्तरावर शासन निर्णय घेईल व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करेल अशी अपेक्षा.