Tar Kumpan Yojana 2025 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अतिवृष्टी, पूर ,किंवा ढगफुटी अन्य कारणामुळे झालेल्या नुकसानीसाठी तसेच, पाण्याच्या सुविधामुळे राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना असो अशा अनेक योजना शासनाकडून राबवल्या जातात. तसेच आता पिकाच्या संरक्षणासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे ती म्हणजे तार कुंपण योजना . ही योजना शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे जंगली आणि पाळीव प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर अशी तार कुंपण अनुदान (Tar Kumpan Yojana 2025) योजना 2025 लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती लोखंडी काटेरी तारक कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे. Tar Kumpan Yojana 2025

तारक कुंपण योजना 2025
ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे की, ज्या भागांमध्ये जंगली प्राण्यांचा त्रास जास्त प्रमाणात आहे , जसे की, मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या शेताचे संरक्षण करणे ही फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी राहिली नाही तर शासनाने यामध्ये थेट मदत करत आहे .यासाठी सरकारने तार कुंपण योजना सुरू केली आहे .या योजनेचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेता भोवती काटेरी तार बसवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यपैकी 90% खर्च सरकार देत असते, तर उर्वरित 10 टक्के खर्च हा शेतकऱ्यांना स्वतः भरावा लागतो .Tar Kumpan Yojana 2025
हे वाचा : सौर कृषी पंप योजनेबाबत मोठी अपडेट!महावितरण कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना..!
तार कुंपण योजनेअंतर्गत किती साहित्य दिले जाते
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेता भोवती काटेरी बसवण्यासाठी तार कुंपण अनुदान योजनेअंतर्गत 2 क्विंटल लोखंडी तार आणि अंदाजे 30 लोखंडी खांब देण्यात येतात . हे साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे . प्रकल्प डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबवली जात आहे .या मागचा उद्देश म्हणजे वन प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे हा आहे . जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही .विशेष म्हणजे ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे .महाराष्ट्र राज्य बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .Tar Kumpan Yojana 2025
अर्ज करण्यासाठी अटी व नियम
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी व नियमाचे पालन करावे लागेल .
- या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा शेत अतिक्रमणातील नसावा .
- त्या शेतीचा वापर पुढील दहा वर्ष शेती शिवाय इतर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही .याबाबतचा ठरावा संबंधित समितीकडे द्यावा लागतो .
- तसेच अर्जदार शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे वनप्राण्यापासून नुकसान होत असल्यास प्रमाणपत्र ग्राम परिस्थिती विकास समिती,संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून घ्यावं लागतं .व हे सर्व कागदपत्रे तयार करून अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करावा लागतो .
- अशा पद्धतीने जर तुमच्या शेताचे वन प्राण्यापासून नुकसान होत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतात .अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 90 टक्के अनुदान दिले जाते .