Galyukt Shivar Anudan : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू करण्यात आली आहे . या योजनेची अनेक शेतकऱ्यांना आज पर्यंत अजूनही माहिती नाही तर तुमच्या शेतात गाळा भरायचा असेल तर यासाठी कोणती योजना? यासाठी कुठे मागणी करावी लागते मागणी केल्यानंतर यासाठी किती अनुदान मिळते, कशी प्रक्रिया आहे. याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.Galyukt Shivar Anudan

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.
या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधून शेतामध्ये गाळ टाकण्यासाठी अर्ज द्यावा लागतो.या योजनेसाठी अल्पभूधारक आणि लहान शेतकरी पात्र असणार आहे.Galyukt Shivar Anudan
हे वाचा : तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? कसं चेक करणार? जाणून घ्या…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सीमांत/अत्यल्पभूधारक (1 हेक्टर पर्यंत) आणि पर्यंत) हे शेतकरी अनुदानाचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
- विधवा शेतकरी, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला, जरी ते शेतकरी जास्त जमीन धारक करत असले, तरीपण ते शेतकरी अनुदानास पात्र असणार आहे.Galyukt Shivar Anudan
अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- 7/12 उतारा (जमिनीचा दाखला)
- आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील.
- शेतकरी सीमांत/अल्पभूधारक (1 हेक्टर पर्यंत), लहान शेतकरी (1ते 2 हेक्टर पर्यंत), विधवा, अपंग आहेत का याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब असलेल्या साठी प्रमाणपत्र.
पात्र शेतकऱ्यांची निवड कशी केली जाईल
अर्ज केल्यानंतर गाळ मिळण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार होईल सरकारने निर्धारित करण्यात आलेल्या निकषानुसार ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल. तयार करण्यात आलेल्या (लाभार्थी ) शेतकऱ्यांची यादी ग्रामसभेमध्ये जाहीर करण्यात येईल.Galyukt Shivar Anudan
गाळ वाहतुकीसाठी अनुदान मंजुरी आणि वितरण
- या योजनेअंतर्गत गाळ वाहून नेणाऱ्या पात्र शेतकरी लाभार्थ्यांना प्रति एकर रु. 35.75/प्रति घनमीटर याप्रमाणे रु. 15,000/- जास्तीत जास्त देय राहील .
- यामध्ये फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच 47 हजार 500 रुपये अनुदान राहील .
- हे अनु पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा केले जाईल.
गाळाचा वापर
या गाळाचा वापर शासनाच्या नियमानुसार शेतातच वापरणे आवश्यक असेल तरच तुम्हाला लाभ मिळू शकतो, यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पण देण्यात आले आहे . या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त सीमांत, अत्यल्प भूधारक, लहान, विधवा , अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जास्तीत जास्त प्राधान्य मिळेल.
तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने या योजनेबद्दल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि त्यांच्या सहभागात प्रोत्साहन द्यावे.Galyukt Shivar Anudan