harbhara hamibhav kharedi: हमीभावाने हरभरा पिकाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची टाळाटाळ… काय आहे कारण?

harbhara hamibhav kharedi : सरकार विविध पिकाची हमीभावाने खरेदी करते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा याकरिता सरकारकडून हमीभावाने (hamibhav) खरेदी केली जाते. परंतु सरकारच्या या हमीभाव खरेदीला हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिसाद देणे टाळले आहे. सरकारकडून 27 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून हरभरा खरीदी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. तरी शेतकऱ्यांकडून या नोंदणीला पाठ फिरवण्यात आली आहे. आजपर्यंत 6514 शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाची harbhara hamibhav kharedi)हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून नोंदणीच कमी प्रमाणात झाल्यामुळे खरेदी देखील कमी प्रमाणात झालेली आहे. सरकारच्या या हमीभाव खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत 288 क्विंटल एवढे हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

या उघडकीस आलेल्या आकडेवारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी यंत्रणेवर आपला विश्वास कमी असल्याचे दाखवून दिले आहे. राज्यामध्ये सरकारने खरेदी केंद्र सुरू केले असून 25 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना हरभरा पिकाची नोंदणी करता येणार आहे. harbhara hamibhav kharedi

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
harbhara hamibhav kharedi

हमीभावाला प्रतिसाद कमी का?

सरकारने सुरू केलेल्या हमीभाव खरे दिला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद का कमी झाला याची कारणे पाहूया. हमीभाव खरेदिला कमी प्रतिसाद मिळण्याची काही प्रमुख कारणे आहेत. यामध्ये शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे की सध्या हरभरा पिकाला बाजारामध्ये 5600 ते 5800 रुपयापर्यंत दर मिळत आहे. हादर हरभरा पिकाच्या हमीभावाच्या जवळपासच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हमीभावाने विक्री करण्याच्या निर्णयाकडे पाठ फिरवली जात आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाने विक्री करायची म्हटलं की नाफेड आणि एनसीसी यांच्या खरेदी केंद्रावर नोंदणी आणि माल विक्रीसाठी घेऊन जावा लागतो. ही प्रक्रिया अत्यंत विलंबाने आणि शेतकऱ्यांना त्रासदायक होत आहे. तर त्या सर्वसाधारण बाजारामध्ये समाधानकारक दर मिळत असल्यामुळे शेतकरी या प्रक्रियेला टाळा टाळ करत आहेत. harbhara hamibhav kharedi

हे वाचा : शेतकऱ्यांचे उत्पन्न मजुरा पेक्षाही कमी… शेतकऱ्यांची महिन्याची कमाई किती?

शेतकऱ्यांच्या अडचणी

हमी भावाने विक्री केलेल्या मालाचे पैसे देखील वेळेवर मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कधीकधी चुकीच्या खात्यावर पेमेंट जातं. अशावेळी शेतकऱ्यांना वारंवार पैशासाठी चकरा मारावे लागतात.

नाफेड खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांना त्रासदायक आणि गैरसोईचं केंद्र बनलेला आहे. या ठिकाणी हमालीसाठी शेतकऱ्याकडून दुप्पट पैसे घेतले जातात. मिळणारे पैसे देखील वेळेवर मिळत नाहीत. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा माल चोरी चला जाण्याचे देखील तक्रारी उपलब्ध आहेत. या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी या यंत्रनेकडे पाठ फिरवली आहे.

नाफेड ने खरेदी केल्या मालामध्ये शेतकऱ्यांच्या मालांमधून प्रत्येक क्विंटल मागे साधारणपणे 400 रुपये लो ग्रेड म्हणून कापले जातात. हे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. यावा अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांना नाफेड कडे मला विक्री करणे परवडत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. harbhara hamibhav kharedi

सुधारणा हवी

नाफेड कडून खरेदी होणाऱ्या मालाची योग्य कार्यप्रणाली राबविण्यात यावी. यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून नाफेड कडून एकूण 545 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या खरेदी केंद्रावर 5634 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आणि या खरेदी केंद्रावर आतपर्यंत 168 क्विंटल खरेदी झाली आहे. एनसीएफ कडून 50 केंद्रावर 973 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आणि या ठिकाणी 84 क्विंटल हरभरा पिकाची खरेदी हमीभावाने (harbhara hamibhav kharedi) झाली आहे. या सर्व आकडेवारीची माहिती घेतल्यानंतर ही संख्या खूपच कमी असल्याचे दिसून येते. सरकारकडून शेतकऱ्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकपणा निर्माण करून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा करता येईल याकडे खरेदी केंद्राचे लक्ष असणे आवश्यक आहे.

सरकारकडून यावर उपाययोजना केल्या नाहीत तर हमीभाव (harbhara hamibhav kharedi) खरेदी योजना ही यशस्वी होणार नाही. आणि शेतकरी बाजारपेठेवरच अवलंबून राहतील. याच पिकासाठी नाही तर शासनाकडून सर्वच खरेदी केल्या जाणाऱ्या पिकासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून हमीभाव खरेदी यंत्रणा अधिक प्रभावीपणे आपले काम पूर्ण करेल. आणि शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. harbhara hamibhav kharedi

Leave a comment