Shetkari Karjmafi News: शेतकऱ्यांसाठी मोठी खबर! आम्ही कर्जमाफी देणारच, पण…. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

Shetkari Karjmafi News : राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आश्वासन दिले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सातत्याने कर्जमाफी या विषयावर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्नाचे उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, केवळ कर्जमाफीची घोषणा केली म्हणून कर्जमाफी करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे NDTV मराठी मंच या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार अगोदरच अनेक योजना सुरू केल्याचे नमूद केले.Shetkari Karjmafi News

Shetkari Karjmafi News

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

महाराष्ट्र राज्यामधील 60 ते 70 टक्के शेतकरी हे आर्थिक तणावात असतात. अशा शेतकऱ्यांना आपण वार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत करतो, पिक विमा योजना तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्सच्या माध्यमातून आर्थिक आधार देत असतो. या सर्व बाबींचा विचार केला तर आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करतच असतो. चांगल्या मान्सूनच्या वर्षामध्ये जर कर्जमाफी दिली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनाच होतो. त्यांनी स्पष्ट केले की, ज्यावेळेस पाऊस काळा हा जास्त असतो तेव्हा शेतकरी कर्ज परतफेड करण्यासाठी सक्षम असतात.

अशावेळी कर्जमाफी केली तर बँकांची थकीत कर्ज वसूल होते, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मर्यादित मिळतो. याउलट, जर दुष्काळासारख्या संकटामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूप गरज असते . देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात दर पाच वर्षांनी एकदा तरी दुष्काळ परिस्थिती उद्भवते. अशातच राज्यामध्ये जर, दुष्काळ नसतानाही कर्जमाफी केली तर राज्याच्या आर्थिक हिताला बाधा आणू शकते. त्यामुळे असतानाच जर आपण कर्जमाफी केली तर त्याचा फायदा बँकांनाच होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.Shetkari Karjmafi News

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : जमीन मोजणी मान्य नसल्यास सरकारचा नवा निर्णय….

योग्य वेळी कर्जमाफी करण्याची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीची घोषणा केली म्हणूनच कर्जमाफी करणे योग्य नाही. कर्जमाफी तर आम्ही करणारच आहोत, परंतु योग्य परिस्थिती असेल तेव्हा कर्जमाफी केली जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही दुष्काळाची वाट पाहतोय असं नाही. जर त्या अगोदर आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर आम्ही कर्जमाफी करणारच आहोत. आम्ही घोषणा केली म्हणून बँकांना याचा फायदा करणे हे योग्य नाही. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट म्हणाले.Shetkari Karjmafi News

लाडकी बहीण योजनेमध्ये सुधारणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या विषयावर बोलत असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. लाडकी बहीण ही योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी राबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या योजनेतून महिलांना वाढीव मदत दिली जाईल.

राज्यातील वित्तीय तूट 3 टक्क्याखाली राखण्यामध्ये सरकारला यश मिळाले आहे , पुढील 2-3 वर्ष आम्ही हीच वित्तीय तूट राखली तर ही योजना राबवणे आणखीन सोपे होईल या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबण्याची संधी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे .Shetkari Karjmafi News

Leave a comment

Close VISIT MN CORNERS