Nitin Gadkari : देशामध्ये सध्या अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे . याला कुठेतरी आळा बसण्यासाठी केंद्र सरकारने अवजड वाहनांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे . हा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेला आहे . त्यामुळे आता देशातील ट्रक, रिक्षा आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या सगळ्याच वाहनांची आता सुरक्षा चाचणी होणार आहे.Nitin Gadkari

ट्रक पासूनते रिक्षा चालकापर्यंत सर्वच वाहनांची सुरक्षा चाचणी होणार.
केंद्र सरकार हे लवकरच आता ट्रक आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा चाचणी करणार आहोत. जसे की, Bharat NCAP च्या नव्याने सुरक्षा चाचणी होती. त्याचप्रमाणे आता इतर वाहनांची पण होणार आहे. यामुळे अपघात झाल्यानंतर वाहन किती सुरक्षित आहे, याची माहिती समोर येण्यास मदत होईल. ही योजना लवकर सुरू केली जाईल.Nitin Gadkari
हे वाचा : वाहनांना HSRP पाटी बसवण्यासाठी मुदत वाढ! कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार? येथे पहा
या मागचा उद्देश
सध्या भारतामध्ये अपघाताचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला कुठेतरी थांबवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रक आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना सेफ्टी चाचणी करणार आहे. या मागचा उद्देशकाय म्हणजे वाहन उत्पादक कंपन्यांनी चांगल्या दर्जाची वाहन आणि सुरक्षेची खात्री करून मगच नंतर ग्राहकांना देण्यात यावी या हेतूने ही योजना सुरू केली जात आहे. हा निर्णय नवीन कार सुरक्षा प्रणाली (GNCAP) आणि रस्ते सुरक्षा शिक्षण संस्था (IRTE) ने मिळून घेतलेला आहे या नवीन निर्णयामुळे ट्रक आणि इतर मालवाहतूक वाहनांची सुरक्षा आणखीन मजबूत बनणार आहे. यामुळे भविष्यामध्ये रस्त्यावरील अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी होईल, नितीन गडकरींनी म्हटले आहे.
ई- रिक्षाची होणार सुरक्षा चाचणी
सरकार आता ई -रिक्षा म्हणजेच बॅटरीवर चालणाऱ्या आरक्षण साठी खास सुरक्षा नियम आणि प्रणाली आणणार आहे .देशांमध्ये सध्या जास्तीत जास्त ई -परीक्षा धावत आहे,यामुळे रिक्षाची सुरक्षा आणि जर दर्जा चांगला असेल तर देशातील अनेक नागरिकांना चांगला रोजगार मिळू शकतो.तसेच,शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल,असेही ते Nitin Gadkari म्हणाले.
देशात दरवर्षी 4.8 लाख अपघाती मृत्यू
देशात 2023 मध्ये शासनाने Bharat NCAP ची सुरुवात केली असून याचा उद्देश असा आहे की, वाहनांची सुरक्षा चांगली पाहिजे. जास्त करून 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी हे आहे. देशामध्ये दरवर्षी जवळपास 4.8 लाख रस्त्यांवर अपघात होत असतात. यामध्ये सरासरी 1.8 लाख होत असतो. यामुळे शासनाचे पहिले काम म्हणजेच , रस्ते सुरक्षा वाढविणे. यासाठी वाहनांची सेफ्टी ही तेवढीच महत्वाची असून इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही योजना लागू केली जाईल. असेही (Nitin Gadkari) गडकरी म्हणाले.
ट्रक चालकही शिफ्टनुसार!
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी असे म्हणाले ,भविष्यात मालवाहतुकीचं प्रमाण हे14-16% वरून 9% आणावं. आमी आस प्रयत्न करत आहोत की, चालवणाऱ्या ड्रायव्हरचा वेळ कमी केला पाहिजे. सध्या ट्रक ड्रायव्हर हे दिवसाला 13 ते 14 तास ट्रक चालू होता त्यामुळे ट्रक चालकांच्या प्रकृतीवर परिणाम होतो आणि ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत सरकार यासाठी कायदा करण्याच्या तयारीमध्ये आहे. जेणेकरून ट्रक ड्रायव्हरला शिफ्ट नुसार काम करता येईल, असेही गडकरींनी स्पष्ट केले.Nitin Gadkari