pik vima : पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा तक्रार

pik vima पिक विमा तक्रार कशी करावी

  pik vima  प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राज्यामध्ये  गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, त्यानंतर शासनाने यामध्ये बदल करून एक रुपय पिक विमा अशी घोषणा करण्यात आली

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    तेव्हापासून राज्यातील  बरेच शेतकरी योजनेमध्ये सहभाग नोंदवतात जेणेकरून आपल्या पिकाचे नुकसान झाले  त्याची भरपाई होईल अशा अशाने सहभागी होत असतात.

   राज्यामध्ये जास्त प्रमाणात  पाऊस तर ढगफुटी होते यामुळे पिकाचे नुकसान होत असते .तर काही काही राज्यांमध्ये अति कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  पिकाचे नुकसान होत असते. झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई व्हावी म्हणून राज्यातील शेतकरी पिक विमा तक्रार करत असतात. पण पिक विमा तक्रार केल्यानंतर ती मंजूर झाली की नाही हे कोठे बघायचं? तसेच पीक विम्यासंबंधी काही तक्रार असेल तर ती नेमकी कुठे नोंदवायची? याबद्दलची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते.

पिक विमा मंजूर झाला की नाही कसे तपासायचे

  •  ज्या शेतकऱ्याने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरलेला असेल तर आपला पिक विमा मंजूर झाला की नाही ते त्या शेतकऱ्यांना मोबाईलवर पाहता येईल.
  •  सर्वप्रथम शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या PMFBY च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल.
  •  त्यानंतर Application Status या पर्यावरण क्लिक करावे.
  •  पिक विमा भरल्यानंतर जी पावती दिली जाते त्या पावतीवरील क्रमांक टाकावा. त्यानंतर कॅप्चा टाका. त्यानंतर Check स्टेटस वर क्लिक करा.
  •  तुमचा पिक विमा मंजूर झालेला असेल तर अप्रूव्ह असे लिहून येईल.

    शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळते का, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात असतो. पण मात्र आपल्या शंका दूर करण्यासाठी तक्रार केल्यानंतर योग्य उत्तर विमा कंपन्या किंवा बँकांकडून मिळत नाही अशी तक्रारी आहेत.

विमा संबंधित तक्रार कोठे करायची

  •  शेतकऱ्यांने पीकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत पूर्ण सूचना द्यावी लागेल.
  •  तसेच मोबाईल मधील Crop insurance App (क्रॉप इन्शुरन्स ॲप) द्वारे किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक द्वारे पूर्ण सूचना देऊ शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांना मोबाईल ॲप वरून किंवा टोल फ्री नंबर वरून सूचना देता येत नसतील तर , त्या शेतकऱ्याने  आपल्या बँकेत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात स्वतः जाऊन पूर्ण सूचना  देऊ शकतात.
  • पण ज्या शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेतली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय विमा तक्रार निवारण समितीकडे जावे लागेल.  अध्यक्ष असलेले तहसीलदार किंवा सदस्य सचिवपदावर असलेले तालुका कृषी अधिकारी तुमची तक्रार नोंदवून घेतात. पण मात्र लक्षात असू द्या या ठिकाणी गेल्यानंतर तक्रारीची पोच घ्या कारण की या पोच अर्जावरचा सही, शिका हा तुमचा तक्रारीचा पुरावा असेल.

pik vima पिक विमा म्हणजे काय

    pik vima ही योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादक जोखमीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानी पासून आर्थिक संरक्षण मिळवण्या शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, ढगफुटी, नैसर्गिक आग, पाण्यामुळे झालेली पिकाची नुकसान, कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले नसल्यास लाभ मिळत नाही हा दृष्टिकोन पिक विमा pik vima योजनेबाबत शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Leave a comment