PM Awas yojana :राज्यातील प्रत्येकाला घर मिळणार! केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता…मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!!

PM Awas yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत .ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यसह देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली जातात .तरआता अशातच पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित एका कार्यशाळेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र कडून आणखीन 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची माहिती दिली आहे ,तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत . महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले बेघर मुक्त राज्य करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे .

ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते .या कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ,राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले ,यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू ,मुख्यमंत्र्यांची सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते.PM Awas yojana

PM Awas yojana

आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत बोलताना म्हटले की, “प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे आणि केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता दिली जाणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि महाराष्ट्रराज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.PM Awas yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : आनंदाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात वाढ; आता घर बांधण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपये मिळणार!

सोलर पॅनल घरांवर बसवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांना प्रधानमंत्री सूर्य कर योजनेतून सौर उर्जेवर विजेची सुविधा उपलब्ध करायचे आहे. या सौर ऊर्जा विजेच्या कामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यामधून एक रोजगाराची चांगली संधी ही निर्माण होईल, अशी माहिती देण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राज्यसह देशभरातील गरजू आणि बेघर नागरिकांसाठी घरे बांधण्यात येत आहेत. नागरिकांच्या भविष्याचा विचार करून हे घरे बनण्यात येत आहे. यातीलच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक घरावर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवण्यात येणार आहे.PM Awas yojana

Leave a comment