pik vima update: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कि कंपनी साठी
संपूर्ण देशभरात सरकार गाजा वाजा करत असलेली योजना, शेतकऱ्यांची आवडती व कंपनीच्या फायद्याची योजना म्हणजे पिक विमा (crop insurance) योजना.
शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कडून पिक विमा योजना राबवण्यात येते. परंतु शेतकऱ्यांना लाभ देताना कंपनी प्रत्येक वर्षी टाळाटाळ करत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. या कंपनीच्या या धोरनाबद्दल सरकार नेमकी योजना कोणासाठी राबवते हेच समजत नाही.
दरवर्षी विविध कारणाने कोणत्या न कोणत्या भागात नैसर्गिक आपत्ति मुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे शेत पिकाचे नुकसान होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्याची कंपनी कडून पाहणी देखील केली जाते. परंतु पिक विमा वाटप करताना कंपनी प्रत्येक वर्षी टाळाटाळ करत आहे. काही भागात 25 टक्के अग्रिम वाटप करून देखील उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप करतेवेळी कंपनी विलंब करत आहे.
pik vima update: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कि कंपनी साठी
राज्यातील पिक विमा वाटप बाबत सर्व घटना पाहता ही योजना नेमकी शेतकऱ्यांसाठी कि कंपनीच्या फायद्यासाठी अशी शंका आता राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात येत आहे.
1 thought on “pik vima update: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कि कंपनी साठी”