साध्याचे कांदा बाजार भाव व पुढील काळात कसे राहतील भाव ? वाचा सविस्तर माहिती : Kanda Bajarbhav 2024

Kanda Bajarbhav 2024 देशांमधील बाजारात कांदा भाव चांगले सुधारले आहेत कांद्याच्या भावाने आता दोन हजारांचा टप्पा पार केला तर किरकोळ बाजारामध्ये ₹40 च्या पुढे सरकले त्यामध्ये नाफेड स्टॉक मधील माल विकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे कांद्याचे भाव कैसे कमी झालेले दिसतात परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Kanda Bajarbhav 2024

बाजारामधील कांदा व कमी झाली असून देशांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला आहे त्यामध्ये बांगलादेश मधून मागणी वाढली आहे परिणामी निर्यातही सुरू आहे दुसरीकडे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील खरीप कांदा एक महिना उशिरा आहे त्यामुळे महाराष्ट्रामधील कांद्याला मागणी वाढली आहे परंतु राज्यांमधील बाजारामध्ये कांदा कमी येत आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत महत्त्वाच्या बाजारामध्ये कांद्याने 2,300 रुपयांचा टप्पा पार केला होता.

हे वाचा : शेतकऱ्यांना कर्ज माफी नाहीच

Kanda Bajarbhav 2024 नाफेडची एन्ट्री :

केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने नागरी स्टॉक मधील कांदा विकणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे कांदा दरवाढीला ब्रेक लागल्याचे दिसून येते कांद्याच्या महत्त्वाच्या बाजारांमधील भाव 2,300 वरती आहे नाफेड कडे 3 लाख टन कांद्याचा स्टॉक उपलब्ध आहे हा कांदा नाफेड बाजारामध्ये विकतोय नाफेडच्या या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक झाले.

कारण आतापर्यंत कांदा उत्पादक खर्चामध्ये कमी भावात विकला गेला आहे आता कुठे भाव वाढले होते त्यामध्ये ही नाफेड आडकाठी घेत आहे म्हणून नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांचा रोष पाहून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी नाफेड महाराष्ट्र मध्ये कांदा विकणार नाही कांदा टंचाई असल्यामुळे राज्यांमध्ये नाफेड कांदा विकेल असे पवार यांनी सांगितले आहे. Kanda Bajarbhav 2024

Kanda Bajarbhav 2024 नाफेड कांद्याचा किती परिणाम होईल ?

नाफेडच्या 3 लाख टन कांदा बाजार वरती परिणाम करू शकतो कारण देशाला दिवसाला जवळपास 50 हजार टनांची गरज असते नाफेड ने सर्व कांदा विकला तरी देशाला फक्त सहा दिवस पुरेल इतका कांदा आहे. म्हणजेच नाफेड देशाची फक्त सहा दिवसाची गरज पूर्ण करू शकते त्यामुळे नाफेडच्या कांद्याचा बाजारावर तेवढा परिणाम राहणार नाही कारण पुरवठा मागणीपेक्षा खूपच कमी आहे.

Kanda Bajarbhav 2024 दरवाढीचे कारण काय ?

ऑगस्टपासून या वर्षी बाजारामधील कांदा व कमी होत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता कारण रब्बी कांद्याची गुणवत्ता यावर्षी कमी आली आहे मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका आणि एप्रिल मध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कांदा गुणवत्तेवर ते परिणाम झाला आहे.

कांद्याची टिकवण क्षमता एक ते दोन महिन्यांनी कमी झाली त्यामुळे यावर्षी बाजारांमधील कांदा आवक लवकर कमी होत जाईल नाहीतर सप्टेंबर बाजारांमधील आवक कमी होते परंतु यंदा ऑगस्ट पासूनच अभाव कमी होत गेली त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. Kanda Bajarbhav 2024

Leave a comment