Pik Vima : शेतामध्ये उभे पीक असताना किंवा पीक काढणे केल्यानंतर जर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या पिकाची नुकसान झाले तर शेतकऱ्यांना इथून पुढे नुकसान भरपाई दिली जाणार नाही . तर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे .
अलीकडे राज्यात सतत पाऊस आणि अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पिक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपन्यांच्या निकषात बदल करण्यात आले होते .Pik Vima

पीक नुकसान भरपाई साठी जुनेच निकष लागू
मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई साठी जुनेच निकष लागू केले जाणार आहे राज्य शासनाच्या बैठकीच्या इतिवृत्तात ही बाब समोर आली आहे .
सध्याच्या काळामध्ये वातावरणामध्ये अनेक बदल घडत आहेत म्हणजेच कडक उन्हाळ्यात पण मध्येच आभाळ येते तर पाऊस पडत असतो तर,पावसाळ्यामध्ये एकदम जोरदार पाऊस नाहीतर ढग फुटी असे प्रकार घडत असतात .यामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते .
असे प्रमाण सध्या वाढत आहे .पावसाळ्यामध्ये ढगफुटी किंवा धो -धो पाऊस, व कधीही पडणारा पाऊस यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्यात जातात आणि धान्य खराब होते तसेच काढून ठेवलेल्या पिकाचेही पाऊस आला तर नुकसान होते .सध्या अतिवृष्टी आणि सतत पडणारा पाऊस यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते .Pik Vima
हे वाचा : नमो शेतकरी आणि पीएम किसान च्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक….!
शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई मिळणार नाही.
यामध्येच आता शासनाने अशा दोन्ही कारणामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर पिक नुकसान भरपाई द्यायचीच नाही,असा निर्णय घेण्यात आला आहे . फक्त पीक कापणी प्रयोग आवर आधारित पीक नुकसान भरपाई विमा कंपनीला द्यावी लागणार आहे .
या चार घटकांवर आधारित नुकसान भरपाई.
केंद्र सरकारने पीक कापणी प्रयोगावर पीक नुकसान भरपाई देण्याचे निकष ठेवण्यात आले आहे तर, राज्य शासनाकडून प्रतिकूल घटकांमुळे पेरणी न होणे,हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेली नुकसान तसेच,०काढणीपतच्यात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान अशा चार बाबींचा समावेश केला होता.
2016-17 ते 2023-24 या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये विमा कंपन्यांना 43 हजार 201 कोटी रुपयेहप्ता राज्य शासनाकडून देण्यात आला असून,यातील शेतकऱ्यांना 32 हजार 658 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे . यामध्ये विमा कंपन्यांना 10 हजार 543 कोटी नफा झाला आहे .Pik Vima
आता एक रुपयाचा पिक विमा बंद
आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षा ठरलेली 1 रुपयात पिक विमा योजना बंद करून ही आता केंद्राच्या नियमानुसार चालविण्यात येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहे .एक रुपया पिक विमा (Pik Vima) योजना आणल्यापासून विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही लाखांच्या पटीत वाढ झाली होती पण आता या पिक विमा योजनेमध्ये प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार असल्यामुळेशेतकऱ्यांची संख्या आपोआप कमी होणार आहे .मात्र एक रुपया पिक विमा योजनेमुळे बोगसगिरीचे पण प्रमाण वाढले होते पण ते पण प्रमाण या नव्या निकषामुळे कमी होईल .Pik Vima