pik vima : मागील काही वर्षांमध्ये एक रुपयात खरी पिक विमा योजनेत अनेक घोटाळे, गैरप्रकार आढळून आले, त्यामुळे सरकारने यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता फक्त पीक कापणी प्रयोग वर आधारितच नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि विमा हप्ता दोन ते पाच टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या गैरप्रकार आला कुठेतरी आळा बसवण्यासाठी बनावट विमा उतरविणारे अर्जदार आणि कंपन्यांचे होणारे पांढरे कुठेतरी आळा बसवण्यासाठी एक रुपयात पिक विमा योजना रद्द करण्यात येणार आहे.pik vima

मागील दोन वर्षापासून राज्यात एक रुपयात खरीप पिक विमा
या योजनेत झालेल्या गैर प्रकारामुळे राज्य सरकारचा अनुदाना कोटीचा निधी वाचून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे. मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये एक रुपया पिक विमा ही योजना राबवण्यात आली आहे. सुरू केल्यापासून पहिल्या वर्षी सुमारे एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिक विमा काढला होता. त्यानंतर 2024 मध्ये एक कोटी 60 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला.
या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच काही जणांनी केले. त्यामुळे ही योजना अत्यंत संकटात सापडली आहे . परिणाम म्हणजे पिक विमा योजना बंद करावी, असा राज्य सरकारचा विचार निधी होता.pik vima
हे वाचा : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बियांची विक्री होणार साथी पोर्टलवरूनच….
पिक विमा योजनेचे निकष बदलले
पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार व्हायला लागले म्हणून कृषी आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या योजनेच्या अटी बदलण्यात याव्या अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली. पिक विमा (pik vima) योजनेसाठी आतापर्यंत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्रीमियम आकारला जात होता. यासाठी एकूण प्रीमियमच्या दोन ते पाच टक्के रक्कम शेतकरी भरत होता. आणि राहिलेल्या उर्वरित हिस्सा केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरत असे. एक रुपयात पिक विमा योजनेमुळे राज्य सरकारला 8 हजार कोटीचा विमा हप्ता कंपनीकडे भरावा लागत होता यातील 20% टक्के कंपनीचा नफा जर धरला तर कंपन्यांचे सुपर पांढरे झाले. या कारणामुळे शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचत नसेल असा राज्य शासनाच्या निदर्शनास आले होते.
या सर्व साखळीमुळे सहभाग फक्त मर्यादित असावा सहभाग जर मर्यादित असल्यास राज्य सरकारच्याही निधी वाचेल, असे मत या प्रस्तावना व्यक्त करण्यात आले.
कांदा या पिकासाठी 5% हप्ता आकारण्याचा प्रस्ताव pik vima
- एक रुपयात पिक विमा देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांच्या हस्त्यातील प्रीमियमचा बरी ही राज्य सरकारत उचलत होते. त्यामुळे आताही हाच निकष परत लावावा, अशी शिफारस राज्य सरकारला केली आहे.
- उदा. जर एखाद्या शेतकऱ्यांचा विमा 100 रुपये असल्यास त्यासाठी त्या शेतकऱ्यांना 2 रुपये विमा हप्ता द्यावा लागणार आहे. खरिपातील महत्त्वाचे पिके असलेल्या कापूस पिकासाठी हा हप्ता 100 रुपयाच्या हप्त्यासाठी पाच रुपये असणार आहे.
- कांदा या पिकासाठी 5 टक्के हप्ता आकारला जाण्याचा प्रस्ताव आहे. रब्बी हंगामातील कांदा हे पीक वगळता इतर सर्व पिकांसाठी विमा हप्ता दीड टक्के असणार आहे. कांद्यासाठी आत्ता 5 टक्के असेल.
एक रुपया पिक विमा असल्याने सर्व शेतकरी घेत होते सहभाग
- सुरुवातीला शेतकरी फक्त पिक विमा काढताना जोखीम असलेल्या पिकाचा विमा काढत होते. परंतु एक रुपया पिक विमा योजना आल्यापासून मात्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता.
- शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झालेल्या पिकाची नुकसान याची तक्रार (इंटिमेशन)विमा कंपनीकडे दिल्यानंतर सर्वेक्षणातून विमा नुकसान भरपाई ठरविण्यात येत होती .यावर्षी तब्बल 1 कोटी तक्रारी कंपन्यांकडे दाखल करण्यात आल्या होत्या .
- दाखल करण्यात आलेल्या सर्व तक्रारीचे निराकारण करणे अशक्य होते .त्यामुळे आता फक्त नुकसान भरपाई प्रयोगानुसारच करावी,अशी महत्त्वपूर्ण शिफारसी ही करण्यात आली आहे. pik vima