Ayushman Bharat Yojana वृद्ध नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वयोमर्यादा आणि रक्कमेत दुप्पट वाढ; केंद्र सरकारला शिफारस

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018पासून सुरू करण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांना मोफत उपचार मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार केला जातो.

या (Ayushman Bharat Yojana) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना कोणत्याही आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च कव्हर केला जातो. परंतु आता उपचारासाठी देण्यात येणारी रक्कम दुप्पट करण्यात यावी अशी केंद्र सरकारला शिफारस करण्यात येत आहे. वयोमर्यादा वाढवून आणि उपचारासाठी देण्यात येणारी पाच लाखाची रक्कम ही दुप्पट करून 10 लाख रुपये करण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे.

Ayushman Bharat Yojana

कुटुंब कल्याण समितीने केंद्र सरकारला शिफारस

आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेअंतर्गत सध्या फक्त 70 वर्षाच्या वृद्ध नागरिकांना मोफत उपचाराचा लाभ दिला जात आहे. परंतु आता 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत उपचाराचा लाभ देण्यात यावा आशी मागणी होत आहे . राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीने केंद्र सरकारला याची मागणी केली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 11 सप्टेंबर रोजी AB- PMJAY वय वंदना योजनेअंतर्गत 4.5 कोटी कुटुंबामधील 70 वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना कव्हर करण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJAY ) विस्तार केला.

हे वाचा : केंद्रीय औद्योगिक दल अंतर्गत 1161 जागा भरती.

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे

आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जुनाट आजारांचा ही समावेश केला जातो. कोणत्याही आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च या योजनेअंतर्गत कव्हर केला जातो. यामध्ये वाहतुकीवरील खर्चाचा समावेश होतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेमध्ये सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स ,उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 5.5 कोटीहून अधिक नागरिकांनी उपचार घेतलेले आहेत .

Ayushman Bharat Yojana योजनेअंतर्गत लाभ

आयुष्यमान भारत ही योजना जगातील सर्वात मोठी विमा योजना आहे,या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 5.5 कोटीहून अधिक लोकांनी घेतलेला आहे . आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशातील सर्वात गरीब 40 टक्के लोकांना दरवर्षी 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जात आहे .

केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत सन 2017 मध्ये सुरू केली आहे .मात्र,पश्चिम बंगाल सह अनेक राज्ये ही योजना स्वीकारस नाकार देत आहेत आणि राज्यात स्वतःच्या योजना चालवत आहेत . Ayushman Bharat योजनेअंतर्गत देशभरातील निवडक सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध करून दिले जाऊ शकतात . या योजनेअंतर्गत नागरिकांना उपचारासाठी प्रवेशाच्या 10 दिवस आधी आणि नंतरचा खर्च भरण्यासाठी तरतूद आहे .Ayushman Bharat Yojana

Leave a comment