शेतकरी ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र
चला तर आपण आज एक नवीन योजना पाहणार आहोत ती म्हणजे शेतकरी गोदाम अनुदान योजना. या योजनेअंतर्गत गोदाम बनण्यासाठी अनुदान दिले जाते. ही योजना संपूर्ण भारतामध्ये राबवली जाते भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो या देशांमध्ये जास्तीत जास्त लोक हे शेती करतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते तसेच महाराष्ट्र राज्य मध्ये अन्नधान्य पिकांची शेती केली जाते.
Table of Contents
Toggleपण त्या पिकांना योग्य भाव मिळत नाही शेतामध्ये उत्पन्न जास्त होते पण ते उत्पन्न मार्केटमध्ये लगेच विकल्यामुळे त्याला भाव लागत नाही आणि एवढा मोठा माल साठवून घरामध्ये ठेवता येत नाही . घरामध्ये एवढा मोठा माल ठेवल्यानंतर उंदीर, किडे या मालाचा नुकसान करतात. आणि माल लगेच विकल्यामुळे त्या मालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची खूप मोठे नुकसान होते हे सर्व राज्य सरकारने लक्षात घेऊन गाव तिथे गोडाऊन देण्याचा निर्णय सरकारने घेतला या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे या गोडाऊन मुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल जेव्हा पाहिजे तेव्हा विकता येणार आहे .
ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र
यासाठी सरकारने पूर्ण गावासाठी गोदाम तयार करायचे ठरवले आहे. गावामध्ये प्रत्येकासाठी तर प्रत्येकासाठी गोदाम करू शकत नाही त्यामुळे सरकारने एका गावात एक गोदाम तयार करू शकतात त्यामध्ये सर्व लोकांची ज्यांची धान्य असणार आहेत ते साठवले जाईल जेणेकरून शेतकऱ्यांना धान्याची नासाडी होणार नाही. असा या सरकारचा उपक्रम आहे

नाबार्ड ग्रामीण गोदाम योजना वैशिष्ट्ये
- नाबार्ड गोदाम योजनेची वैशिष्ट्ये
केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन आणि कापणीचे पावसापासून आणि इतर प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी योग्य गोदाम बनवता येतात या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्रता होण्यासाठी - नाबार्ड मार्गदर्शक तत्त्वाची पूर्तता करणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
गोदामाचे बांधकाम सरकारने मांडलेले सर्व निकष आणि वैशिष्ट्येची पालन करणे आवश्यक आहे. - हे गोदाम उंदीर आणि पक्षापासून सुरक्षित असले पाहिजे.
- वेअर हाऊस चे उद्घाटन मानक प्रोटो कॉल नुसार असणे आवश्यक आहे.
- स्टोरेज ची योग्य स्थापना आणि अग्नीच्या दुर्घटना विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय असणे आवश्यक आहे.
- लोडिंग आणि अन अनलोडींग साठी आत बाहेर सहज प्रवेश असावा

ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र कोण पात्र आहे?
गोदाम यासाठी उद्योजक ,सरकारी संस्था ,कंपन्या स्वयंसेवी संस्था ,शेतकरी गट इ. यासाठी पात्र आहे.
योजनेचा समावेश होतो
गोदामे, सायलोचे बांधकाम आणि कोल्ड स्टोरेज किंवा दुरुस्ती.
स्टोरेज युनिट ची किमान क्षमता
* जास्तीत जास्त किमान 100 टन कमाल 10,000 टन क्षमता.
* काही विशेष भागामध्ये लहान युनिट साठी किमान 50 टन क्षमता.
* ग्रामीण डोंगराळ भागांमध्ये 25 टनापर्यंतच्या लहान युनिट साठी देखील अर्ज करू शकतात.
ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र
कर्जाची रक्कम
- शेतकरी सरकारी आणि कृषी पदवीधारकांसाठी 20-25% मुद्दल.
- SC/ST साठी 33.3%
- 10- 15% व्यक्ती, कॉपोरेटस आणि कंपन्या.

गोदाम नाबार्ड सबसिडी चे फायदे
- गोदामाच्या विविध पैलूंच्या दुरुस्ती आणि बांधकामाच्या स्वरूपात विविध खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना मोठा बोजमुक्त करते.
- जरी स्टोरेज क्षमता वाटप केलेल्या मर्यादे पेक्षा जास्त असेल तरीही तुम्हाला परवानगी असलेल्या मर्यादित कर्ज मिळू शकते
- गोदाम ही सरकारी योजना दोन्ही व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या गटाला कर्जासाठी अर्ज करू देते.
- तुम्ही लहान स्टोरेज बँकेकडून योग्य तपासणी करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.
ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शिधापत्रिका
- बँक खाते क्रमांक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पत्त्याचा पुरावा
हे सर्व कागदपत्रे गोदाम सरकारी अनुदानासाठी अर्जामध्ये नमूद केलेले आहे. हे सर्व कागदपत्रे कर्जासाठी आवश्यक आहेत.
गोदाम बांधकाम अनुदानातील तोटे
- कृषी गोदाम अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी जितकी फायदेशीर आहे, तितकीच कर्जाची रक्कम 10,000 टनापर्यंतच लागू आहे.
- या योजनेसाठी तुम्ही इतर कोणत्याही स्त्रोतांकडून मदत घेतल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही. जास्त साठवण क्षमता असलेल्या साठी हे आव्हानात्मक असू शकते.
- तुम्ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असाल तर तुम्हाला लहान स्टोरेज युनिट साठी कर्ज मिळू शकते.
ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र
गोदाम अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
वेबसाईट ओपन केल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे प्रदान करा
कृषी गोदाम अनुदानासाठी अर्ज सबमिट करा अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात.

ग्रामीण गोदाम योजना महाराष्ट्र निष्कर्ष
गोदाम अनुदान योजना ही भारतात सर्व राज्यांमध्ये राबवली जाते या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना उन्हाळा ,पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये माल साठवून ठेवण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यां च्या मालाचे उंदीर, पक्षांपासून संरक्षण होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य ते भाव मिळणार आहे गाव तिथे गोदाम या योजनेचा लाभ सर्व गावांमध्ये घ्यावा असा सरकारचा उद्देश आहे.